‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांत वाढ   

सरकारी संकेतस्थळ आणि संस्था लक्ष्य

मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारी संकेतस्थळांना लक्ष्य करण्याचे पर्यायाने सायबर हल्ल्यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. पाकिस्तानातून ते अधिक झाल्याचेे महाराष्ट्र सायबर अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
सरकारी संकेतस्थळांना लक्ष्य करुन महत्वाच्या प्रशासकीय यंत्रणेला बाधा पोहोचविण्याचा उद्योग करण्यात आला होता. त्यात पाकिस्तान आणि समर्थक आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्यांचा प्रामुख्याने समावेश होता. सायबर हल्ले चढवून खोटी माहिती प्रसारीत करण्याचे उद्योग केले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर किचकट पायाभूत यंत्रणा आणि सरकारी संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते. सायबर हल्ले करुन अपारंपरिक आक्रमक युद्धाला सुरूवात आंतराष्ट्रीय पातळीवरुन प्रामुख्याने पाकिस्तानातून करण्यात आली होती. भारताविरोधात सायबर युद्धच पुकारण्यात आले होते. संकेतस्थळावर हल्ले झाल्यानंतर सेवा खंडित झाली. नंतर त्यावर व्यत्यय येत असल्याचे संदेश चोरट्यांंनी पसरवले होते. त्यामुळे सरकारच्या विश्वासाहर्तेला तडा गेला होता. संकेतस्थळावर सायबर हल्ले चढवताना चोरट्यांनी मेलवेअरचा वापर करुन फाइल्स संक्रमित केल्या. 
 
त्यामुळे संकेतस्थळ वापरणार्‍यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. यानंतर सतर्क झालेल्या सायबर विभागाने पावले टाकत हल्ले कोठून होत आहेत? याचा शोध घेतला  हल्ला झाला असल्याची माहिती सार्वजनिक तातडीने करुन उपाययोजना केल्या. त्यामध्ये कोणत्या संस्थेवर अथवा विभागावर सायबर हल्ला झाला. याचा तपशील जाहीर केला होता. त्यामुळे संबंधित संकेतस्थळाचा वापर करणार्‍यांना दिलासा मिळाला होता. तसेच डिजिटल मजकुराबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले होते. दरम्यान महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते की, दहा लाखांवर सायबर हल्ले झाले होते. ते पाकिस्तानातील गट, पश्चिम आशियातील देश आणि मोरक्को येथून  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रामुख्याने केले होते. 

Related Articles